Mumbai University: मुंबई विद्यापीठाची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप!

मुंबई: मुंबई विद्यापीठाने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत ६७ वरून थेट ५२ क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीतही विद्यापीठाने २९१-३०० रँकिंग बँडमधून २४५ व्या स्थानी पोहोचत गुणवत्ता सुधारली आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठ आशियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान बजावू लागले आहे.

क्वाकरेली सायमंड्स (QS) च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने धोरणात्मक सुधारणांना प्राधान्य देत, संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता यासह इतर निकषांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. विद्यापीठाने यंदा १९ वरून ३४ एकूण गुण मिळवत आपला दर्जा अधिक भक्कम केला आहे.




मुंबई विद्यापीठाने पेपर्स पर फॅकल्टी या निकषात ९०.६ गुण मिळवत सर्वाधिक प्रगती साधली आहे. त्यानंतर नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३ आणि इतर महत्त्वाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे. तसेच, विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील आपले मागील स्तर टिकवले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व घटकांनी संशोधन व विकासाच्या दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यात सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत