काम रखडवण्यात महाविकास आघाडीची PHD; तर काँग्रेस ब्रेक लावण्यात तरबेज, PM मोदींचा हल्लाबोल

चिमुर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या सभा एकदम दणक्यात सुरू आहेत. आज चिमुर येथे PM मोदी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. महाराष्ट्राच्या विकासात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात PHD केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. फक्त ब्रेकिंगच्या कामात महाविकास आघाडीने PHD केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. काँग्रेसवरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधलाय. दुप्पट पीएचडी काँग्रेसनेसुद्धा केली असल्याचं त्यांनी म्हंटल. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. यात काँग्रेसी लोक निष्णात आहेत. प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा घोर आरोपही मोदींनी केला.


सर्व उपस्थितांना पंतप्रधान मोदींनी विचारले की, चिमुरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, त्यांची तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हंटल.



यावेळी मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर चांगलाच खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, महायुतीचं सरकार कोणत्या गतीने काम करतं आणि हे आघाडी पक्ष काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगलं कोण जाणू शकेल? अनेक दशकांपासून इथले लोक रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी कधीही त्यावर काम होऊ दिले नाही, असंही मोदी म्हणाले.


भाजपचा येणाऱ्या ५ वर्षात जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आज मला अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन