निवडणुकीदरम्यान काँग्रेसची मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची हकालपट्टी

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवला जात आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरीही केली जात आहे. काँग्रेसने रविवारी १६ बंडखोर उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली.


महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही सूचना दिली. या सूचनेवरून पक्षाने बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. या उमेदवारांना पक्षातून ६वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.


यामध्ये रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल येथील काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, कसबा मतदार संघाचे कमल व्यवहार यांच्यासोबत १६ जणांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.


याआधीच काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे भाजपकडूनी मंगळवारी ३७ विधानसभा मतदारसंघाती ४० बंडखोर नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

Comments
Add Comment

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावल्या, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या