बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशातून अटक

  100

मुंबई: मुंबईतील बाबा सिद्द्की हत्या प्रकरणात शूटर शिवकुमारला रविवारी एसटीएफ उत्तर प्रदेश आणि मुंबई क्राइम ब्राँचने संयुक्त कारवाई करत उत्तर प्रदेशातील बहारिच येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोप बहारिच बॉर्डर येथून नेपाळला पळण्याच्या तयारीत होता.


शिवकुमारला शरण देण्यासाठी आणि नेपाळला पळून जाण्यासाठी मदत करण्याच्या आरोपात अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेंद्र प्रताप सिंह यांना अटक करण्यात आली. हे सर्व गंडारा गावात राहणारे आहेत आणि सर्व मित्र आहेत.



पुण्यातून पकडले गेले होते २ आरोपी


मुंबई क्राइम ब्राँचने एनसीपीचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात ६ नोव्हेंबरच्या रात्री पुण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडे मुंबईत चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीत हे ही समोर आले आहे की आरोपींना आपल्या टार्गेटची संपूर्ण माहिती होोती. त्यांच्या ४० राऊंड गोळ्या आणि इतर हत्यारे ताब्यात घेण्यात आली. फरार आरोपी शुभम लोणकरने या दोघांना हत्येसाठी हत्यारे दिली होती.

काय आहे प्रकरण


एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला मुंबईच्या वांद्रे येथील त्यांचा मुलगा जीशानच्या कार्यालयाबाहेर गोळी मारून हत्या केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही