कहरचं! दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं!

  90

उत्तर प्रदेश : माणुसकी नावाची गोष्टीचं राहिली नाही... उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल आहे. खरं तर या महिलांना कुत्र्याच्या पिल्लांचा आवाज सहन न झाल्यामुळे त्यांनी धक्कादायक घटना घडवून आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलांना कुत्र्याच्या ५ पिल्लांच्या आवाजाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी पिल्लांना जिवंत जाळले आणि त्यांना गाढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयर नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.


या २ महिला आरोपींनी लहान पिल्लांवर पेट्रोल टाकून त्यांचा जीव घेतला. मेरठमधील कांकरखेडा परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला राहत असलेल्या घराजवळील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे राहणाऱ्या भटक्या कुत्र्याची लहान पिल्ले खूप जोरात ओरडत होती. त्यांचा आवाज सहन न झाल्याने संबंधित महिलांनी त्यांना ठार केले.




माणुसकीला काळीमा फासणारी घटना


वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अंशुमली यांच्या तक्रारीवरुन २ महिलांविरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. आरोपी शोभा आणि आरती या दोघींची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघींवर भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक माहिती घेत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ५ नोव्हेंबरला रोहता रोडजवळील संत नगर कॉलनीत ही घटना घडली. एका भटक्या श्वानाने अलीकडेच ५ पिल्लांना जन्म दिला. त्यांचा आवाज सहन न झाल्याने आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत