कहरचं! दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं!

उत्तर प्रदेश : माणुसकी नावाची गोष्टीचं राहिली नाही... उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल आहे. खरं तर या महिलांना कुत्र्याच्या पिल्लांचा आवाज सहन न झाल्यामुळे त्यांनी धक्कादायक घटना घडवून आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलांना कुत्र्याच्या ५ पिल्लांच्या आवाजाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी पिल्लांना जिवंत जाळले आणि त्यांना गाढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयर नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.


या २ महिला आरोपींनी लहान पिल्लांवर पेट्रोल टाकून त्यांचा जीव घेतला. मेरठमधील कांकरखेडा परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला राहत असलेल्या घराजवळील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे राहणाऱ्या भटक्या कुत्र्याची लहान पिल्ले खूप जोरात ओरडत होती. त्यांचा आवाज सहन न झाल्याने संबंधित महिलांनी त्यांना ठार केले.




माणुसकीला काळीमा फासणारी घटना


वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अंशुमली यांच्या तक्रारीवरुन २ महिलांविरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. आरोपी शोभा आणि आरती या दोघींची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघींवर भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक माहिती घेत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ५ नोव्हेंबरला रोहता रोडजवळील संत नगर कॉलनीत ही घटना घडली. एका भटक्या श्वानाने अलीकडेच ५ पिल्लांना जन्म दिला. त्यांचा आवाज सहन न झाल्याने आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले.

Comments
Add Comment

Bengaluru News : क्रूरतेला कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फुटेजमुळे उघडं

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस