Railway Accident : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले

कोलकाता : देशभरात रेल्वे अपघातांचे (Railway Accident) सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. आज पुन्हा पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे (Shalimar-Secunderabad Express accident) चार डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास कोलकाता सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२८५०) मध्य मार्गावरून डाऊन लाइनकडे जात असताना एका पार्सल व्हॅनसह इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.


सध्या अपघातस्थळी, संतरागाछी आणि खरगपूर येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय मदत गाड्या तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना कोलकात्याला नेण्यासाठी बसही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) ओमप्रकाश चरण यांनी दिली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात