Railway Accident : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले

कोलकाता : देशभरात रेल्वे अपघातांचे (Railway Accident) सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. आज पुन्हा पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे (Shalimar-Secunderabad Express accident) चार डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास कोलकाता सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२८५०) मध्य मार्गावरून डाऊन लाइनकडे जात असताना एका पार्सल व्हॅनसह इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.


सध्या अपघातस्थळी, संतरागाछी आणि खरगपूर येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय मदत गाड्या तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना कोलकात्याला नेण्यासाठी बसही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) ओमप्रकाश चरण यांनी दिली.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा