Railway Accident : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रेल्वे अपघात! सिकंदराबाद-शालीमार एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले

कोलकाता : देशभरात रेल्वे अपघातांचे (Railway Accident) सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. आज पुन्हा पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे (Shalimar-Secunderabad Express accident) चार डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास कोलकाता सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२८५०) मध्य मार्गावरून डाऊन लाइनकडे जात असताना एका पार्सल व्हॅनसह इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.


सध्या अपघातस्थळी, संतरागाछी आणि खरगपूर येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय मदत गाड्या तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना कोलकात्याला नेण्यासाठी बसही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) ओमप्रकाश चरण यांनी दिली.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०