Palghar News : पालघरमध्ये ४ कोटींची रोकड हस्तगत!

  100

पालघर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता (Code Of Conduct) लागू असतानाच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्याचे प्रकार समोर येत आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत राज्यातील विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त (Cash Seized) केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, मराठवाडा यांसह आता पालघरमधूनही मोठ्या रक्कमेची रोकड जप्त झाली आहे.


९ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. विक्रमगडकडे जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली. या वाहनाने ऐरोली, नवी मुंबई येथून वाडा, जव्हार, मोखाडा मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली आणि यातून कोट्यवधी रुपयांची रोकड उघड झाली.


पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी केली जात आहे. वाडा पोलिसांना विक्रमगड मार्गावर संशयित व्हॅन दिसल्याने तपासणी केली असता त्यात तीन कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून तिचा उपयोग निवडणुकीत होण्याची शक्यता असल्याचा संशय आहे.

Comments
Add Comment

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट