कर्णधाराशी वाद घातल्यामुळे अल्झारी जोसेफवर २ सामन्यांची बंदी; रागाने मैदान सोडले होते

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफवर २ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने कर्णधार शाई होपवर फिल्ड प्लेसमेंटवरून वाद घातल्याबद्दल बंदी घातली आहे. २७ वर्षीय वेगवान गोलंदाज जोसेफने सामन्याच्यावेळी मैदान सोडले.क्रिकेट वेस्ट इंडीजने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, जोसेफचे वर्तन सी डब्ल्यूआयच्या व्यावसायिकतेच्या मानकांनुसार नव्हते.


या प्रकरणावरून जोसेफने माफी देखील मागितली. ज्यामध्ये जोसेफने असे म्हटले होते की, मी कर्णधार शाई होप आणि माझे सहकारी आणि व्यवस्थापन यांची वैयक्तिक माफी मागितली आहे. मी वेस्ट इंडिजच्या चाहत्यांसाठी माझी मनापासून माफी मागतो, कृपया समजून घ्या की, निर्णयात थोडीशी चूक देखील दूरगामी परिणाम करू शकते. घडलेल्या घटनेबद्दल मला मनापासून खेद आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ वेस्ट इंडिज-इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार शेन होपशी वाद घालताना दिसला.


कर्णधार शेन होपने सेट केलेले क्षेत्ररक्षण त्याला पटले नाही, जेव्हा त्याने कर्णधाराला ते बदलण्यास सांगितले तेव्हा होपने नकार दिला. त्यामुळे तो संतापून मैदानाबाहेर पडला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ एका षटकापर्यंत १० क्षेत्ररक्षकांसह खेळत राहिला. मात्र, नंतर तो मैदानात परतला.


'अल्झारीचे वर्तन क्रिकेट वेस्ट इंडिजच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत नव्हते. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. - माइल्स बास्कोम्बे, सीडब्ल्यूआयचे संचालक

Comments
Add Comment

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर