उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा; आधी महिलांचा मानसन्मान राखा मग महाराजांची मंदिरे बांधा

  96

शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे यांची उबाठावर घणाघाती टीका


महिलांचा वारंवार अपमान करणारे राऊत बंधू दुर्योधन-दुष्यासन


मुंबई : महिलांचा दररोज अपमान करणारे संजय राऊत आणि सुनील राऊत हे दुर्योधन दुष्यासन आहेत, आधी महिलांचा मानसन्मान राखा मग छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधा, अशी घणाघाती टीका शिवसेना सचिव डॉ. मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उबाठावर केली. मुख्यमंत्री असताना बजेटबद्दल अवाक्षर माहित नसलेल्या उबाठाचा वचननामा म्हणजे भुलथापा आहेत, असे त्या म्हणाल्या. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


डॉ. कायंदे म्हणाल्या की उबाठाचा वचननाम्यामध्ये महिलांना ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. जेव्हा महायुती सरकारने लाडक्या बहिणांना १५०० दिले तेव्हा याच विरोधकांनी बजेटमध्ये तरतूद केली आहे का? पैसे कुठून आणणार असे प्रश्न विचारले होते. लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टातही गेले होते, मग आता ३००० रुपये ते कुठून आणणार आहेत, असा सवाल डॉ. कायंदे यांनी केला. ज्यांना बजेट कळत नाहीत त्यांची आश्वासने म्हणजे भुलथापा आहेत, असा टोला ड़ॉ. कायंदे यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही सोडले म्हणून संजय राऊत, सुनील राऊत, अरविंद सावंत यांच्याकडून महिलांचा अपमान झाला. मात्र याबाबत उद्धव ठाकरे अजूनही गप्प आहेत, अशी टीका डॉ. कायंदे यांनी केली. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दुष्यासन यांचा अंत झाला तसाच संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा लाडक्या बहिणी शेवट करतील, असे त्यांनी सांगितले.


काँग्रेसच्या तेलंगणा, हिमाचल, कर्नाटकमधील योजना दीड दोन महिन्यात बंद झाल्या, आमची योजना सहा महिन्यांपासून सुरू आहे. उबाठा महिलांना कुठल्या बसने मोफत प्रवास देणार असा सवाल त्यांनी केला. कुटुंबांना २५ लाखांचा वैद्यकीय विमा देणार या निव्वळ भूलथापा आहेत. कोविडकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी वापरला नाहीत. अडीच वर्षात केवळ फक्त दोन कोटी खर्च केले. मोफत औषध देणार म्हणता मग कोरोनात बॉडीबॅग, रेमडीसिव्हीर का मोफत दिले नाहीत, असा खोचक सवाल डॉ. कायंदे यांनी केला. महाविकास आघाडी वचननाम्याला पंचसूत्री म्हणत असले तरी आमच्यासाठी ते कळसुत्री आहे, असा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.


डॉ. कायंदे यांनी राहुल गांधी यांच्यावरही यावेळी टीका केली. राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा वाढवणार असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचे फेक नरेटिव्ह पसरवले मग आता आरक्षणाची मर्यादा वाढवून तुम्हाला संविधान बदलायचे आहे का,असा सवाल कायंदे यांनी केला. राहुल गांधी यांच्या हातातील लाल पुस्तक नक्की संविधान आहे की आणखी काही ते तपासायला हवं असे त्या म्हणाल्या.



वर्षा गायकवाड यांनी माफी मागावी


मविआच्या मुंबईतील सभेतला एक व्हिडिओ समोर आला आहे. यात छत्रपतींची मूर्ती शरद पवार यांना देण्यासाठी कार्यकर्ता आला असता, वर्षा गायकवाड यांनी स्वत:च्या फोटोसाठी कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांना झिडकारलं. वर्षा गायकवाड यांनी या कृत्याबाबत माफी मागावी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. कायंदे यांनी केली. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरुंपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.