म्हातारपणातही हाडे राहतील मजबूत, रोज डाएटमध्ये सामील करा या गोष्टी

मुंबई: हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमचा महत्त्वाचा रोल असतो. खाण्यापिण्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. अशातच आजपासून कॅल्शियम रिच डाएटला सुरूवात केली पाहिजे.


वय वाढल्यानंतर हाडे कमजोर होऊ लागतात. यामुळे याच्याशी संबंधित समस्या वाढतात. खासकरून ५० वर्षांनी हाडांच्या समस्या अधिक होतात. कारण वय वाढत जाते तसतसे हाडांतून कॅल्शियम कमी कमी होत जाते.अशातच म्हातारपणातही हाडे मजबूत ठेवणे आणि हेल्दी राखणे गरजेचे असते.


आज आम्ही तुम्हाला ५ पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे दररोज खाल्ल्याने हाडे मजबूत बनतील.



पनीर


पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असते. यामुळे हाडे मजबूत होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज ५० ग्रॅम पनीर खाल्ले पाहिजे. यातून अनेक पोषकतत्वे मिळतात.



नट्स आणि सीड्स


नट्स आणि सीड्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. याशिवाय मॅग्नेशियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.



हिरव्या भाज्या


कॅल्शियम आणि व्हिटामिन दोन्ही हाडांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर असते. यामुळे खाण्यामध्ये पालक, केल, ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा.



अंडी


अंडी पोषकतत्वांनी भरलेली असतात. यात व्हिटामिन डी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हे हाडांसाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे नेहमी डाएटमध्ये याचा समावेश करा.



मासे


हाडांच्या मजबुतीसाठी मासेही गरजेचे आहेत. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन डी आढळते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण