Vinod Tawde: ना फडणवीस, ना तावडे, मग कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी तर स्पष्टच सांगितले...

मुंबई: येत्या १४ दिवसांत राज्यात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे. पण आता यासोबतच चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची. कोणत्याही पक्षाने अद्यापही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण महायुतीत मात्र एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात आहे. पण याच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेत, पण जर का महायुती विजयी झाली तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. ०५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा झाली तर मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी