ICC Test Ranking : मालिका गमावताच आयसीसीचा भारतीय संघाला दणका!

गुणतालिकेत मोठी घसरण; विराट-रोहित टॉप २० मधून बाहेर


नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीने गुणतालिका घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. तर रिषभ पंतचा चांगलाच फायदा झाला आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप राहिलेल्या विराटला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. तो ६५५ रेटींग पॉईंट्ससह २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचीही मोठी घसरण झाली आहे. रोहित ६२९ रेटींग पॉईंट्ससह २६ व्या स्थानी आहे.


इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही महिन्यांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या बळावर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. केन विलियम्सन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र ८०४ रेटींग पॉईंट्ससह तो अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचाच फलंदाज हॅरी ब्रुक ७७८ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.



रिषभ पंतची दमदार कामगिरी


रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. या जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी रिषभने महत्वपूर्ण खेळी करुन संघाचा डाव सावरला. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव