ICC Test Ranking : मालिका गमावताच आयसीसीचा भारतीय संघाला दणका!

गुणतालिकेत मोठी घसरण; विराट-रोहित टॉप २० मधून बाहेर


नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीने गुणतालिका घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. तर रिषभ पंतचा चांगलाच फायदा झाला आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप राहिलेल्या विराटला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. तो ६५५ रेटींग पॉईंट्ससह २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचीही मोठी घसरण झाली आहे. रोहित ६२९ रेटींग पॉईंट्ससह २६ व्या स्थानी आहे.


इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही महिन्यांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या बळावर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. केन विलियम्सन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र ८०४ रेटींग पॉईंट्ससह तो अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचाच फलंदाज हॅरी ब्रुक ७७८ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.



रिषभ पंतची दमदार कामगिरी


रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. या जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी रिषभने महत्वपूर्ण खेळी करुन संघाचा डाव सावरला. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे