ICC Test Ranking : मालिका गमावताच आयसीसीचा भारतीय संघाला दणका!

गुणतालिकेत मोठी घसरण; विराट-रोहित टॉप २० मधून बाहेर


नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीने गुणतालिका घोषणा केली आहे. या रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा धक्का बसला आहे. तर रिषभ पंतचा चांगलाच फायदा झाला आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप राहिलेल्या विराटला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. तो ६५५ रेटींग पॉईंट्ससह २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माचीही मोठी घसरण झाली आहे. रोहित ६२९ रेटींग पॉईंट्ससह २६ व्या स्थानी आहे.


इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने गेल्या काही महिन्यांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या बळावर तो गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. केन विलियम्सन भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त होता. मात्र ८०४ रेटींग पॉईंट्ससह तो अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचाच फलंदाज हॅरी ब्रुक ७७८ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.



रिषभ पंतची दमदार कामगिरी


रिषभ पंतने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. या जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी रिषभने महत्वपूर्ण खेळी करुन संघाचा डाव सावरला. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आयसीसी रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच