Salman Khan : सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर...

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी!


मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. अशातच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) धमकी मिळाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमार्फत लारेन्स बिष्णोईचा भाऊ बोलत असल्याचे सांगत धमकी देण्यात आली आहे. यामध्ये 'सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, किंवा पाच कोटी रुपये द्यावे, असे न केल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे', असे लिहले आहे. सोमवारी मध्यरात्री हा मेसेज आला असून मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत.


सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे या प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमक्या देण्यास सुरुवात केली. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले