शंभुराज देसाई यांच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी सांगितला गुवाहाटीचा ‘तो’ किस्सा

  41

सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. दिवाळी संपताच प्रचार सभांना जोरदार सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी यश आले आहे. २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ तारखेला होणार आहे.


शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे जनता साथ कोणाला देणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीचे आणि शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटण येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी शंभुराज देसाई यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.



पाटणच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. या भूमीत आपला जन्म झाला ही अभिमानाची बाब आहे. जेव्हा माझ्या जन्मभूमीमध्ये कार्यक्रम असतो तेव्हा तयाचा आनंद आणि समाधान वेगळे असते. बाळसाहेब आणि शिवाजीराव देसाई यांचा लोककल्याणाचा वारसा घेऊन शंभुराज देसाई पुढे निघाले आहेत. ”



फक्त कोमट पाणी प्या म्हणून सरकार चालत नाही


पुढे बोलताना मुखमंत्री शिंदे म्हणाले, “तुम्हाला ही जनता विजयी केल्याशिवाय राहणार नाही. शंभुराज देसाई यांची हॅट्रिक झाली आहे आता चौकार बाकी आहे. शंभुराज देसाई करोंना काळामध्ये वणवण फिरला. लोकाना मदत करणारा आमदार जो कोणी असेल तर तो शंभुराज देसाई. त्यांचे काम बोलते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी काम करत आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभुराज देसाई. आम्ही दोन वर्षांपूर्वी उठाव केला नसतं तर तुम्हाला २,९०० कोटींचा निधी मिळाला नसता. पूर्वीचे सरकार हे बहिरे होते. नुसते घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून, फक्त कोमट पाणी प्या म्हणून सरकार चालत नाही. त्यासाठी जनतेमध्ये जावे लागते.”



शंभुराज देसाई हाच आमचा आमदार


“या जनतेने शंभुराज देसाई हाच आमचा आमदार आहे असे ठरवले आहे. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई दोन पावले माझ्यापुढे होते. म्हणून मी त्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले. उठाव करताना शंभुराज देसाई सर्वात पुढे होते. त्यावेळेस त्यांनी कुठे चाललोय, काय करतोय याबद्दल काहीही विचारले नाही. त्यांनी छातीचा कोट करून लढाई लढली आणि हेच पाटणचे पाणी मला दिसले. जो शब्द देतो, तो शब्द पाळणारा माणूस मला आवडतो. शंभुराज देसाईला घाबरायची गरज नाही कारण, त्याच्यामागे येडोबा आहे, नाईकबा आहे, भैरोबा आहे. ज्योतिबा आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामागे आहेत. म्हणून कोणी येउदेत, पाटणचा किल्ला शंभुराज देसाईच सर करणार”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित