दिवाळीत फटाके फोडताना जखमींची संख्या ४९ वर

मुंबई : दिवाळीमध्ये ठिकठिकाणी मोठ्य प्रमाणात फटाके फोडण्यात आले. मात्र हे फटाके फोडताना मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांत जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे.


दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी फुलबाजे, भुई चक्र, सुतळी बार, रॉकेट असे विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. हे फटाके फोडताना मुंबईमध्ये विविध ठिकाणी जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. केईएम रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. शीव रुग्णालयात १२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बहुतांश रुग्ण हे भाजलेले आहेत.


त्याचप्रमाणे नायर रुग्णालयात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. कूपर रुग्णालयामध्ये दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णलयांच्या प्रमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.


जे. जे. रुग्णालयामध्ये चारजण उपचारासाठी आले होते, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींपैकी तीन जणांवर बाह्यरुग्ण विभागातच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तिघेही किरकोळ जखमी झाले होते. त्याचप्रमाणे फटाके फोडताना जखमी झाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तीन जण उपचारासाठी दाखल झाले होते. या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा