दिवाळीत फटाके फोडताना जखमींची संख्या ४९ वर

मुंबई : दिवाळीमध्ये ठिकठिकाणी मोठ्य प्रमाणात फटाके फोडण्यात आले. मात्र हे फटाके फोडताना मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांत जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे.


दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी फुलबाजे, भुई चक्र, सुतळी बार, रॉकेट असे विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. हे फटाके फोडताना मुंबईमध्ये विविध ठिकाणी जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. केईएम रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. शीव रुग्णालयात १२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बहुतांश रुग्ण हे भाजलेले आहेत.


त्याचप्रमाणे नायर रुग्णालयात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. कूपर रुग्णालयामध्ये दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णलयांच्या प्रमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.


जे. जे. रुग्णालयामध्ये चारजण उपचारासाठी आले होते, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींपैकी तीन जणांवर बाह्यरुग्ण विभागातच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तिघेही किरकोळ जखमी झाले होते. त्याचप्रमाणे फटाके फोडताना जखमी झाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तीन जण उपचारासाठी दाखल झाले होते. या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार; मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचले

'बुरखेवाली' महापौर होण्याची भीती वाटत नाही का? मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण