काँग्रेसची डोकेदुखी वाढली; बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

पुणे: राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपणार आहे. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत.

सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायल मिळत आहे. यामुळे आपापल्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान राजकीय पक्षासमोर उभे ठाकले आहे. यासाठी राजकीय पक्ष बंडखोरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेतय.

काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देखील कमल व्यवहारे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कालपासून कमल व्यवहारे नॉट रिचेबल असल्याने पक्षाची डोकेदूखी वाढली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी दोन दिवसापूर्वी बंडखोरांच्या घरी जाऊन बैठका घेतल्या होत्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कमल व्यवहारे नॉट रिचेबल असल्याने काँग्रेसचे टेन्शन वाढलंकसबा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास महायुतीकडून भादपचे नेते हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देणअयात आली आहे. तर, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने हा सामना पाहायला मिळणार आहे. यंदा अडीच वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत गमाविलेला कसबा मतदारसंघ भाजप पुन्हा ताब्यात घेणार का हे पाहावे लागणार आहे.

 
Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८