शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे, घोगरे, पिपाडा यांच्यात चुरशीची लढत?

राहाता : शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या १२ उमेदवारी अर्जांपैकी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे अखेरच्या दिवशी ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण ८ उमेदवार उरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांनी दिली.


शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी १५ व्यक्तींनी २५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये १२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचे अंतिम दिवशी अखेर उमेदवार तुषार गणेश सदाफळ, ममता राजेंद्र पिपाडा, जनार्दन चंद्रभान घोगरे, सुदर्शन लक्ष्मण शितोळे या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ८ उमेदवार शिल्लक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुती एक महाविकास आघाडी एक व अन्य अपक्ष सहा असे मिळून ८ उमेदवार विधानसभेकरिता आपले राजकीय भविष्य अजमविणार आहेत. अर्ज माघारीनतर निवडणुकीच्या रिंगणात आता महायुती कडून अर्थात भाजपचे उमेदवार म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महाविकास आघाडीकडून अर्थात काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे, अपक्ष म्हणून डॉ राजेंद्र मदनलाल पिपाडा, रामनाथ भाऊसाहेब सदाफळ, रेश्मा अल्ताफ शेख, मयूर संजय मुर्तडक, राजू सादिक शेख व मोहम्मद इसहाक इब्राहिम शहा आदी उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध