Thackeray vs Shinde : ठाकरे -शिंदे समोरासमोर भिडणार; मंगळवारी कोल्हापुरात राडा होणार

कोल्हापुर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९९५ मध्ये कोल्हापूरमधून प्रचाराचा प्रारंभ केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखिल आपल्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्याचे ठरवले आहे. तसेच शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखिल अंबाबाईचे दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. (Thackeray-Shinde will face each other; Rada will be held in Kolhapur on Tuesday)


कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचा प्रचाराचा शुभारंभ एकाच दिवशी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन तेथेच प्रचाराचा नारळ फोडून जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी कोल्हापुरात राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील आरोग्याच्या स्थितीनंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक सभा असेल. त्यांनी अॅजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर विश्रांती घेतली होती. परंतु आता ते कोल्हापुरात प्रचारात सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यात काही माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तपोवन मैदानात आयोजित सभेत ते प्रचाराचा शुभारंभ करतील. कोल्हापुरात प्रचारावेळी शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर सतेज पाटील यांनी काही टिकात्मक विधानं केली होती. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद