Thackeray vs Shinde : ठाकरे -शिंदे समोरासमोर भिडणार; मंगळवारी कोल्हापुरात राडा होणार

कोल्हापुर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९९५ मध्ये कोल्हापूरमधून प्रचाराचा प्रारंभ केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखिल आपल्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्याचे ठरवले आहे. तसेच शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखिल अंबाबाईचे दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. (Thackeray-Shinde will face each other; Rada will be held in Kolhapur on Tuesday)


कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचा प्रचाराचा शुभारंभ एकाच दिवशी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन तेथेच प्रचाराचा नारळ फोडून जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी कोल्हापुरात राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील आरोग्याच्या स्थितीनंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक सभा असेल. त्यांनी अॅजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर विश्रांती घेतली होती. परंतु आता ते कोल्हापुरात प्रचारात सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यात काही माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तपोवन मैदानात आयोजित सभेत ते प्रचाराचा शुभारंभ करतील. कोल्हापुरात प्रचारावेळी शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर सतेज पाटील यांनी काही टिकात्मक विधानं केली होती. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार