IND vs NZ: टीम इंडिया शेवट गोड करणार का? वानखेडेवर आजपासून सामना

  33

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत या मालिकेत आपली लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. याआधीच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका विजय मिळवला आहे. त्यातच शेवटचा सामना जिंकत टीम इंडिया मुंबईकरांना विजयी गिफ्ट देणार का हे पाहावे लागेल.


गेल्या १२ वर्षांपासून टीम इंडियाने मायभूमीत मालिका गमावली नव्हती. मात्र न्यूझीलंडने त्यांना पराभवाचे पाणी पाजले. भारताच्या स्पिन गोलंदाजांना मदत करणारी पिच बनवण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. आता त्यांना पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टिकून राहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल.


भारताने आतापर्यंत चार डावांपैकी तीन डावांत ४६, १५६ आणि २४५ धावा केल्या आहेत. यावरून त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी दिसते. दरम्यान, टीम इंडियाला लवकरच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी