IND vs NZ: टीम इंडिया शेवट गोड करणार का? वानखेडेवर आजपासून सामना

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत या मालिकेत आपली लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. याआधीच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका विजय मिळवला आहे. त्यातच शेवटचा सामना जिंकत टीम इंडिया मुंबईकरांना विजयी गिफ्ट देणार का हे पाहावे लागेल.


गेल्या १२ वर्षांपासून टीम इंडियाने मायभूमीत मालिका गमावली नव्हती. मात्र न्यूझीलंडने त्यांना पराभवाचे पाणी पाजले. भारताच्या स्पिन गोलंदाजांना मदत करणारी पिच बनवण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. आता त्यांना पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टिकून राहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल.


भारताने आतापर्यंत चार डावांपैकी तीन डावांत ४६, १५६ आणि २४५ धावा केल्या आहेत. यावरून त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी दिसते. दरम्यान, टीम इंडियाला लवकरच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत