IND vs NZ: टीम इंडिया शेवट गोड करणार का? वानखेडेवर आजपासून सामना

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारत या मालिकेत आपली लाज वाचवण्याचा प्रयत्न करेल. याआधीच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने जिंकत न्यूझीलंडने मालिका विजय मिळवला आहे. त्यातच शेवटचा सामना जिंकत टीम इंडिया मुंबईकरांना विजयी गिफ्ट देणार का हे पाहावे लागेल.


गेल्या १२ वर्षांपासून टीम इंडियाने मायभूमीत मालिका गमावली नव्हती. मात्र न्यूझीलंडने त्यांना पराभवाचे पाणी पाजले. भारताच्या स्पिन गोलंदाजांना मदत करणारी पिच बनवण्याचा डाव त्यांच्यावरच उलटला. आता त्यांना पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टिकून राहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल.


भारताने आतापर्यंत चार डावांपैकी तीन डावांत ४६, १५६ आणि २४५ धावा केल्या आहेत. यावरून त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी दिसते. दरम्यान, टीम इंडियाला लवकरच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.