Diwali : दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’

गुणवत्ता मध्यम श्रेणीत; धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली


मुंबई : दिवाळीच्या (Diwali) दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात गुरुवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमी आवाजाच्या मात्र अधिक आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील हवा गुरुवारपासून खालावली आहे.


मुंबईतील विमानतळ परिसर वगळता शुक्रवारी सर्व भागात धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली होती. भायखळा, देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘वाईट’ हवा नोंदली गेली होती. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०५, २०८, २६६, २०२, २५३, २८५ इतका होता. या सर्व भागांतील हवेची गुणवत्ता गुरुवारपासून खालावली आहे.


हवा निर्देशांक १०० पेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञ म्हणणे आहे. नेमक्या दिवाळीतील दोन दिवसांत या नोंदीने शंभरी पार केली आहे. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मुंबईच्या अनेक भागातील हवेची गुणवत्ता शुक्रवारी संध्याकाळी ‘वाईट’ स्वरूपाची होती. हवेचा दर्जा सकाळी ‘मध्यम’ स्वरूपाचा होता. मात्र दुपारनंतर हवेची गुणवत्ता ढासळत गेली.


दरम्यान, फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच परिसरात धुराचे लोटही पसरले होते. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष करून बालके, गर्भवती, वृध्द आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा