Diwali : दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’

गुणवत्ता मध्यम श्रेणीत; धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली


मुंबई : दिवाळीच्या (Diwali) दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात गुरुवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमी आवाजाच्या मात्र अधिक आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील हवा गुरुवारपासून खालावली आहे.


मुंबईतील विमानतळ परिसर वगळता शुक्रवारी सर्व भागात धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली होती. भायखळा, देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘वाईट’ हवा नोंदली गेली होती. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०५, २०८, २६६, २०२, २५३, २८५ इतका होता. या सर्व भागांतील हवेची गुणवत्ता गुरुवारपासून खालावली आहे.


हवा निर्देशांक १०० पेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञ म्हणणे आहे. नेमक्या दिवाळीतील दोन दिवसांत या नोंदीने शंभरी पार केली आहे. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मुंबईच्या अनेक भागातील हवेची गुणवत्ता शुक्रवारी संध्याकाळी ‘वाईट’ स्वरूपाची होती. हवेचा दर्जा सकाळी ‘मध्यम’ स्वरूपाचा होता. मात्र दुपारनंतर हवेची गुणवत्ता ढासळत गेली.


दरम्यान, फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच परिसरात धुराचे लोटही पसरले होते. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष करून बालके, गर्भवती, वृध्द आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या