Diwali : दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’

गुणवत्ता मध्यम श्रेणीत; धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली


मुंबई : दिवाळीच्या (Diwali) दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात गुरुवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमी आवाजाच्या मात्र अधिक आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील हवा गुरुवारपासून खालावली आहे.


मुंबईतील विमानतळ परिसर वगळता शुक्रवारी सर्व भागात धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली होती. भायखळा, देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘वाईट’ हवा नोंदली गेली होती. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०५, २०८, २६६, २०२, २५३, २८५ इतका होता. या सर्व भागांतील हवेची गुणवत्ता गुरुवारपासून खालावली आहे.


हवा निर्देशांक १०० पेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञ म्हणणे आहे. नेमक्या दिवाळीतील दोन दिवसांत या नोंदीने शंभरी पार केली आहे. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मुंबईच्या अनेक भागातील हवेची गुणवत्ता शुक्रवारी संध्याकाळी ‘वाईट’ स्वरूपाची होती. हवेचा दर्जा सकाळी ‘मध्यम’ स्वरूपाचा होता. मात्र दुपारनंतर हवेची गुणवत्ता ढासळत गेली.


दरम्यान, फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच परिसरात धुराचे लोटही पसरले होते. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष करून बालके, गर्भवती, वृध्द आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण