बोइसर चाळीतील घरात धक्कादायक स्फोट; स्फोटाच कारण अस्पष्टच

पालघर: बोईसर शहरातील अवध नगरमधील दुबे चाळीमध्ये बुधवारी रात्री स्फोट होऊन चार जण जखमी झाले. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकले नाही. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अवधनगरमधील दुबे चाळीत अचानकपणे झालेल्या या घटनेत दोन मुलं एक महिला आणि एक पुरुष हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेत संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की, घरातील कपाटासह इतर वस्तूंचा चक्काचूर झाला असून येथील इमारतीच्या सिमेंट बांधकाम केलेल्या तीन मजबूत भिंती कोसळल्या. परंतु, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अवधनगर अलसिफा हा परिसर दाट लोकवस्तीचा असून स्फोट झाल्यानंतर आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे सांगण्यात येत आहे.तर बोईसर पोलिस नेमका स्फोट कशामुळे घडला याचा तपास करत आहेत
Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.