ISRO : ‘इस्रो’कडून पुढच्या १५ वर्षांचा रोडमॅप तयार!

आगामी वर्षात रोबो, २०२६ मध्ये अंतराळ मानवी मोहीम, २०४० मध्ये चंद्रावर


नवी दिल्ली : येत्या ३ महिन्यांत 'इस्रो'ची (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित मोहीम लाँच होणार आहे. ‘इस्रो’त (ISRO) त्याच्या पूर्वतयारीचीच लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ‘इस्रो’ने पुढील १५ वर्षांत राबवायच्या मोहिमांच्या रोडमॅपवरही शेवटचा हात फिरवून झाला आहे. ‘इस्रो’ने त्यासाठी ४० वर्षांचे कॅलेंडरही तयार केले आहे. त्यातून भारतीय अंतराळ मोहिमांबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.


मानवरहित मोहिमेनंतर 'इस्रो' गगनयानातून ‘व्योममित्र’ नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे. एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने या ‘व्योममित्र’ रोबोचे वर्तन अगदी मानवाप्रमाणे असेल. २०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ व्या सुरुवातीस तीन दिवसांच्या पृथ्वी परिक्रमेसाठी २ भारतीय अंतराळवीर पाठवण्याची 'इस्रो'ची योजना आहे. २०२९ पर्यंत ३ मानवी मोहिमा अंतराळात राबवल्या जातील. मोहिमेला प्राप्त यशाच्या आधारावर अंतराळ फेण्या व वीरांची संख्याही वाढवली जाईल.



सहा उपग्रह पाठवणार


पुढच्याच वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ‘इस्रो’ ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. नौदलासाठी जीसॅट-७ आर, लष्करासाठी जीसॅट-७ बी, ब्रॉडबैंड आणि इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी जीसॅट-एन २, सुरक्षा दले, निमलष्करी ३ दले. रेल्वेसाठी जीसॅट- एन ३, गगनयानासोबत कनेक्टिव्हिटीसाठी २ उपग्रहही लाँच केले जातील.



गगनयान काय ?


गगनयान या ३ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० कि. मी. वरील कक्षेत पाठवले जाईल आणि नंतर सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवले जाईल. यात यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत असा चौथा देश ठरेल.



‘इस्रो’चे कॅलेंडर



  • २०२५ - मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार.

  • २०२७ - चांद्रयान-४ मिशन लाँच करणार, चंद्रावरून नमुने आणणार.

  • २०२८ - भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल-१ अंतराळात पाठवणार, स्वदेशी यान जोडणी प्रयोगही अंतराळात पार पडेल. अंतराळातच २ याने परस्परांना जोडली जातील.

  • २०३१ - चंद्रावर मानवी मोहीम.

  • २०३५ - अंतराळात भारताचे स्थानक उभारणार

  • २०३७ - भारतीय रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार. शुक्रावर यान पाठवणार.

  • २०४० - चंद्रावर भारतीय पाऊल उमटवण्याची योजना.

Comments
Add Comment

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील