निवडणूक धामधुमीत २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.


१११ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मुंबईत अवघे ११ पोलीस निरीक्षक मुंबई बाहेरून आले. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकाची मंजूर पदे १०३२ आहेत. मात्र ३१ जुलैपर्यंत कार्यरत ८८१ होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता २४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल.

Comments
Add Comment

मुंबईच्या विकासाकडे नाही तर दिवा,घड्याळ, साडी, फणी, वेणीकडे लक्ष; महापौरांनी शेलक्या शब्दांत घेतला विरोधी पक्षनेत्यांचा समाचार

मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या

शिवछत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे निलंबन करा; मंत्री नितेश राणे विधानसभेत कडाडले

मुंबई: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत

जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले मुंबई : "वर्षाला

मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी दीक्षा कारकर तर बाजार,उद्यान समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार मुंबई : राज्यातील गरजू