Ayodhya Diwali : अयोध्येत ५०० वर्षानंतर होणार दिवाळी साजरी!

तब्बल २५ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळणार परिसर


उत्तर प्रदेश : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या जानेवारी महिन्यात प्रभु श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. ५०० वर्षानंतर अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरात मोठ्या थाटामाटात दिवाळी (Ayodhya Diwali) साजरी होणार आहे.


अयोध्येमध्ये रामलल्ला यांच्या अभिषेकनंतर पहिल्यांदाच नव्या राम मंदिरात दिवाळी साजरी होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून शरयू काठी तब्बल २५ लाख दिवे लावले जाणार आहेत. त्याचबरोबर भगवंताचे पुष्पक विमानाने आगमन साकरण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या दिपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हस्ते होणार आहे.



पर्यावरणपूरक फटाक्यांची अतिषबाजी


आज होणाऱ्या दीपोत्सवामध्ये अयोध्येत पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. हे फटाके १२० ते ६०० फूट उंचीवर आकाशात उडणार आहेत. तसेच परिसरातील ५ किमीच्या अंतरावरून ते पाहता येणार आहेत.


शरयू ब्रिजवर आज सायंकाळी फटाक्यासह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.



मोठ्या संख्येने सुरक्षाकर्मचारी तैनात


दिवाळी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची सुरक्षा लक्षात घेता, अयोध्येत सुमारे १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच राममंदिराकडे जाणारे सर्व रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले असून केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी या मार्गावर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने