Ranjith Balakrishnan : अभिनेत्याचा लैंगिक छळ! प्रसिद्ध दिग्दर्शकावर पुन्हा गुन्हा दाखल

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत दिग्गज दिग्दर्शक म्हणून यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे याच दिग्दर्शकावर लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.


बंगुळुरुमधील एका ३१ वर्षीय अभिनेत्याने दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एका हॉटेलमध्ये बोलवून दिग्दर्शकाने अभिनेत्यावर लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्याने सांगितले की, तो दिग्दर्शक रंजितला पहिल्यांदा कोझिकोडमध्ये भेटला होता, जेव्हा ते दिग्दर्शक 'बावुतीयुदे नमाथिल' चित्रपटाचे शूटिंग करत होते. ऑडिशनच्या बहाण्याने त्याला हॉटेलमध्ये बोलावून जबरदस्तीने माझे कपडे काढायला लावले आणि लैंगिक छळ केला,अशी तक्रार अभिनेत्याने केली आहे.



अभिनेत्रीनेही केली लैंगिक छळाची तक्रार


याआधीही रंजीतवर एका बंगाली अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले होते. रंजितने तिला २००९ मध्ये 'पलेरी मणिक्यम' चित्रपटाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून तिला अश्लील प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता.


तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक रंजितविरोधात सततच्या होणाऱ्या या आरोपांमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद