Srinivas Vanaga : आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता, बारा तासांपासून फोनही बंद!

मनात धक्कादायक विचार, पत्नीकडून गौप्यस्फोट


पालघर : पालघरचे (Palghar) शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) मागील बारा तासांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून कडक तपास केला जात असून या घटनेमुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.



श्रीनिवास वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार


श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितले नाही. तसेच त्यांचे दोन्ही फोन बंद असून त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.


सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्या घराबाहेर जमले आहेत.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक