गौतम गंभीर द.आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही, या दिग्गजाकडे जबाबदारी

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्यावर भारतीय संघ आपला पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळत आहे. यानंतर संघ १० नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी गकेबरहा जाणार. त्यानंतर सेंच्युरियनमध्ये १३ नोव्हेंबरला आणि जोहान्सबर्ग येथे १५ नोव्हेंबरला सामने खेळवले जातील.


आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दौऱ्यावर संघासोबत असणार नाहीत. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ ४ नोव्हेंबरला रवाना होईल. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. अशातच गंभीर केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल.


गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्ही व्ही एस लक्ष्मण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असतील. चार सामन्यांची ही टी-२० मालिका आधी ठरलेली नव्हती मात्र बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील बातचीतनंतर याला अंतिम रूप देण्यात आले.


साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोचिंग स्टाफचा भाग असतील.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण