Abhinav Arora : बाल संत अभिनव अरोराला बिश्नोई गँगकडून धमकी!

  126

मुंबई : बाल संत म्हणून सोशल मीडियावर व्हायरल असणाऱ्या अभिनव अरोराला (Abhinav Arora) बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे सामाजिक अत्याचार करण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचा आरोप केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याभरापासून अभिनव अरोराबाबत अपप्रचार सुरू आहे. त्याला वारंवार फोन करुन अपशब्द उच्चारले जातात. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. अभिनवने भक्तीशिवाय इतर काहीच केले नाही. परंतु तरीही बिश्नोई टोळीकडून त्याला मारण्याची धमकी दिली जाते, असा दावा अभिनवच्या घरच्यांनी केला.



अभिनव अरोराची कोर्टात धाव


अभिनव अरोरा यांनी ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबर बाल संत अभिनव अरोरा यांनी सात युट्युबर्सविरुद्ध एफआयआरची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे पालकही उपस्थित होते. अभिनव अरोरा यांनी मथुरेच्या एसीजेएम कोर्टात याचिका दाखल करून सोशल मीडियावर ट्रोल केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे.


अभिनव अरोरा म्हणाले की, प्रभू रामाचा हेतू अमली पदार्थांचे प्रदूषण थांबवण्याचा होता. त्यामुळे प्रभू राम यांना न्यायासाठी पुढे जाण्यास भाग पाडले गेले. असे उदाहरण देत 'मला कोर्टात जाण्याची इच्छा नव्हती, पण युट्युबर्सनी मला तसे करण्यास भाग पाडले', असे अभिनव अरोराने म्हटले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या