Health: दररोज दही खाणे फायदेशीर आहे का? घ्या जाणून

  89

मुंबई: जर तुमचे आरोग्य निरोगी आहे आणि तुम्ही मर्यादित प्रमाणात दही खात आहात याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. अशातच जर तुम्ही रात्रीच्या वेळेस दही खात असाल तर यामुळे कफ बनत असेल तर डॉक्टर हे खाण्यासाठी मनाई करू शकतात. अशातच दररोज दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...


दह्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरलेले आहेत. अनेकजण दही आवडीने खातात. दही खाल्ल्याने अनेक पोषकतत्वे शरीरास मिळतात. मात्र रोज रोज दही खाणे योग्य आहे का? की यामुळे काही नुकसानही होऊ शकते.


शरीरातील सेल्स वाढवण्यासाठी अमिनो अॅसिडची आवश्यकता असते जे प्रोटीनमधून मिळते. मसल्स, त्वचा, केस, नखे हे सर्व प्रोटीनपासून बनलेले असते. अशातच दररोज शरीराला प्रोटीन देण्यासाठी दही हे चांगले माध्यम आहे. १०० ग्रॅम दही खाल्ल्यास ११.१ ग्रॅम प्रोटीनची पूर्तता होते.


आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे जेवण पचवण्यासाठी मदत करतात. यांची संख्या कायम राखण्यासाठी दही फायदेशीर ठरते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, गॅस, पोटात जळजळसारख्या समस्या दूर होतात.


आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम अतिशय गरजेचे असते. याच्या कमतरतेमुळे हाडे कमी आणि कमकुवत होऊ लागतात. अशातच दही खाऊन तुम्ही शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता. दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आढळते.


शरीरातील नसांसाठी, मेंदू आणि रक्तासाठी व्हिटामिन बी १२ची गरज असते. हे व्हिटामिन फार कमी पदार्थांमध्ये आढळते. दरम्यान, दही हे दुधापासून बनवलेले असेल तर व्हिटामिन बी १२ मिळते.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या