पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

  54

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ इंजिन फेल झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, सध्या रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.


मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोडजवळ इंजिन अचानक फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पालघर रेल्वे स्थानकावरचं थांबून राहिली आहे. तसेच, गुजरातवरून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.




रेल्वे अधिकाऱ्यांची तत्काळ कारवाई


या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने केळवे रोड परिसरात दाखल झाले आहेत. मालगाडीच्या फेल झालेल्या इंजिनची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यामुळे लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.


रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या या इंजिन फेलमुळे काही काळासाठी त्रास सहन करावा लागला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

Comments
Add Comment

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी