पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ इंजिन फेल झाल्याने रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, सध्या रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.


मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे केळवे रोडजवळ इंजिन अचानक फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पालघर रेल्वे स्थानकावरचं थांबून राहिली आहे. तसेच, गुजरातवरून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.




रेल्वे अधिकाऱ्यांची तत्काळ कारवाई


या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने केळवे रोड परिसरात दाखल झाले आहेत. मालगाडीच्या फेल झालेल्या इंजिनची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यामुळे लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.


रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या या इंजिन फेलमुळे काही काळासाठी त्रास सहन करावा लागला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन