Diwali 2024: मुंबईत फटाके फोडण्याबाबत BMCने जारी केले नवे नियम, ही आहे फटाके फोडण्याची वेळ

मुंबई: मुंबईत वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी दिवाळीला फटाके फोडण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीसाठी गाईडलाईन जारी करताना सांगितले की मुंबईकर रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू शकत नाही. सोबतच आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता देण्याचे अपील करण्यात आले आहे.


जारी केलेल्या नियमांनुसार, रोषणाई असलेला हा दिवाळीचा सण मुंबईकरांनी पर्यावरणासाठी अनुकूल पद्धतीने साजरा केला पाहिजे. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना सुरक्षेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. खासकरून मुलांनी सावधतेने फटाके फोडावेत. असे फटाके फोडावे ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल. आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.


नगरपालिकेने सांगितले की, मुंबईकर दिवाळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करताना फटाक्यांची रोषणाई, पणत्या-दिव्यांची सजावट मोठ्या प्रमाणात होते. आतषबाजीमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण होते. जर प्रदूषण रोखायचे असेल तर योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.



कमीत कमी फटाके फोडा, बीएमसीचे अपील


बीएमसीने म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रित राखण्यासाठी नगरपालिकेकडून अनेक उपाय केले जात आहे. लोकांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. फटाकेही शक्य होईल तितके कमी फोडले पाहिजेत. यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुले, गर्भवती महिला, वयस्कर तसेच अस्थमाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यासंबंधित समस्या होतात.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन