Diwali 2024: मुंबईत फटाके फोडण्याबाबत BMCने जारी केले नवे नियम, ही आहे फटाके फोडण्याची वेळ

मुंबई: मुंबईत वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी दिवाळीला फटाके फोडण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीसाठी गाईडलाईन जारी करताना सांगितले की मुंबईकर रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू शकत नाही. सोबतच आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता देण्याचे अपील करण्यात आले आहे.


जारी केलेल्या नियमांनुसार, रोषणाई असलेला हा दिवाळीचा सण मुंबईकरांनी पर्यावरणासाठी अनुकूल पद्धतीने साजरा केला पाहिजे. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना सुरक्षेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. खासकरून मुलांनी सावधतेने फटाके फोडावेत. असे फटाके फोडावे ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल. आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.


नगरपालिकेने सांगितले की, मुंबईकर दिवाळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करताना फटाक्यांची रोषणाई, पणत्या-दिव्यांची सजावट मोठ्या प्रमाणात होते. आतषबाजीमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण होते. जर प्रदूषण रोखायचे असेल तर योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.



कमीत कमी फटाके फोडा, बीएमसीचे अपील


बीएमसीने म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रित राखण्यासाठी नगरपालिकेकडून अनेक उपाय केले जात आहे. लोकांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. फटाकेही शक्य होईल तितके कमी फोडले पाहिजेत. यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुले, गर्भवती महिला, वयस्कर तसेच अस्थमाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यासंबंधित समस्या होतात.

Comments
Add Comment

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन