Diwali 2024: मुंबईत फटाके फोडण्याबाबत BMCने जारी केले नवे नियम, ही आहे फटाके फोडण्याची वेळ

मुंबई: मुंबईत वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी दिवाळीला फटाके फोडण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीसाठी गाईडलाईन जारी करताना सांगितले की मुंबईकर रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू शकत नाही. सोबतच आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता देण्याचे अपील करण्यात आले आहे.


जारी केलेल्या नियमांनुसार, रोषणाई असलेला हा दिवाळीचा सण मुंबईकरांनी पर्यावरणासाठी अनुकूल पद्धतीने साजरा केला पाहिजे. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना सुरक्षेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. खासकरून मुलांनी सावधतेने फटाके फोडावेत. असे फटाके फोडावे ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल. आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.


नगरपालिकेने सांगितले की, मुंबईकर दिवाळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करताना फटाक्यांची रोषणाई, पणत्या-दिव्यांची सजावट मोठ्या प्रमाणात होते. आतषबाजीमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण होते. जर प्रदूषण रोखायचे असेल तर योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.



कमीत कमी फटाके फोडा, बीएमसीचे अपील


बीएमसीने म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रित राखण्यासाठी नगरपालिकेकडून अनेक उपाय केले जात आहे. लोकांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. फटाकेही शक्य होईल तितके कमी फोडले पाहिजेत. यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुले, गर्भवती महिला, वयस्कर तसेच अस्थमाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यासंबंधित समस्या होतात.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका