Diwali 2024: मुंबईत फटाके फोडण्याबाबत BMCने जारी केले नवे नियम, ही आहे फटाके फोडण्याची वेळ

मुंबई: मुंबईत वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी दिवाळीला फटाके फोडण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिवाळीसाठी गाईडलाईन जारी करताना सांगितले की मुंबईकर रात्री १० वाजेनंतर फटाके फोडू शकत नाही. सोबतच आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता देण्याचे अपील करण्यात आले आहे.


जारी केलेल्या नियमांनुसार, रोषणाई असलेला हा दिवाळीचा सण मुंबईकरांनी पर्यावरणासाठी अनुकूल पद्धतीने साजरा केला पाहिजे. सोबतच दिवे लावताना आणि फटाके फोडताना सुरक्षेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. खासकरून मुलांनी सावधतेने फटाके फोडावेत. असे फटाके फोडावे ज्यामुळे कमीत कमी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल. आवाजविरहित फटाके फोडण्याला प्राथमिकता दिली पाहिजे.


नगरपालिकेने सांगितले की, मुंबईकर दिवाळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण साजरा करताना फटाक्यांची रोषणाई, पणत्या-दिव्यांची सजावट मोठ्या प्रमाणात होते. आतषबाजीमुळे वायू तसेच ध्वनी प्रदूषण होते. जर प्रदूषण रोखायचे असेल तर योग्य ती सावधगिरी बाळगली पाहिजे. यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.



कमीत कमी फटाके फोडा, बीएमसीचे अपील


बीएमसीने म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रित राखण्यासाठी नगरपालिकेकडून अनेक उपाय केले जात आहे. लोकांना दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. फटाकेही शक्य होईल तितके कमी फोडले पाहिजेत. यामुळे वायू प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मुले, गर्भवती महिला, वयस्कर तसेच अस्थमाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यासंबंधित समस्या होतात.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले