उबाठाला झटका; उमेदवार तनवाणी यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले आहे. अद्यापही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काही जागांवरुन वाद असल्याचे दिसून येते. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर, येथील जागेवरुन शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघातून एमआयएमने नासेर सिद्दिकी यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, येथील लढत तिरंगी होत असल्याचं दिसून येतंय. त्यातच, आता या मतदारसंघात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या तनवाणी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, ठाकरेंनी तनवाणी यांच्यावर कारवाई करत येथील उमेदवार बदलला आहे.



एमआयएमचा उमेदवार विजयी होऊ नये म्हणून माघार


छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती आहे, म्हणजे येथून एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक धक्के या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. त्यातच, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी किंवा राजीनाम्याचे प्रकार घडत असताना, चक्क उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवाराने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद