Assembly election 2024: बारामती मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यावर भावूक झाले अजित पवार

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बारामती मतदारसंघातून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीला त्यांनी संबोधित केले. या दरम्यान अजित पवार भावूक झाले. सोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोपही केला.


कार्यकर्त्यांशी बातचीत करताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संगातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा यांना उतरवून खूप चूक केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचे आहे की राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर नाही आणले पाहिजे, कारण पीढी एक होण्यास वेळ लागतो आणि कुटुंब तोडण्यास एक क्षणही पुरेसा असतो.



साहेबांनी कुटुंबात विभाजन केले


अजित पवार यावेळी बोलताना अतिशय भावूक झाले. त्यानंतर स्वत:ला सांभाळताना ते पुढे म्हणाले, साहेबांनी कुटुंबाच्या आत विभाजन केले. लोकसभेच्या वेळेस मतदार भावूक झाले होते. यावेळेस भावूक होऊ नका. कारण भावूक होण्याने समस्या सुटत नाहीत. विकासाने समस्या सुटतात. बारामतीच्या जनतेते ताईंना लोकसभेत निवडले आता दादांना आमदार म्हणून निवडले पाहिजे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बारामती येथून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर