Assembly election 2024: बारामती मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यावर भावूक झाले अजित पवार

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बारामती मतदारसंघातून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीला त्यांनी संबोधित केले. या दरम्यान अजित पवार भावूक झाले. सोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोपही केला.


कार्यकर्त्यांशी बातचीत करताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संगातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा यांना उतरवून खूप चूक केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचे आहे की राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर नाही आणले पाहिजे, कारण पीढी एक होण्यास वेळ लागतो आणि कुटुंब तोडण्यास एक क्षणही पुरेसा असतो.



साहेबांनी कुटुंबात विभाजन केले


अजित पवार यावेळी बोलताना अतिशय भावूक झाले. त्यानंतर स्वत:ला सांभाळताना ते पुढे म्हणाले, साहेबांनी कुटुंबाच्या आत विभाजन केले. लोकसभेच्या वेळेस मतदार भावूक झाले होते. यावेळेस भावूक होऊ नका. कारण भावूक होण्याने समस्या सुटत नाहीत. विकासाने समस्या सुटतात. बारामतीच्या जनतेते ताईंना लोकसभेत निवडले आता दादांना आमदार म्हणून निवडले पाहिजे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बारामती येथून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक