Assembly election 2024: बारामती मतदारसंघातून अर्ज दाखल केल्यावर भावूक झाले अजित पवार

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बारामती मतदारसंघातून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीला त्यांनी संबोधित केले. या दरम्यान अजित पवार भावूक झाले. सोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोपही केला.


कार्यकर्त्यांशी बातचीत करताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संगातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा यांना उतरवून खूप चूक केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचे आहे की राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर नाही आणले पाहिजे, कारण पीढी एक होण्यास वेळ लागतो आणि कुटुंब तोडण्यास एक क्षणही पुरेसा असतो.



साहेबांनी कुटुंबात विभाजन केले


अजित पवार यावेळी बोलताना अतिशय भावूक झाले. त्यानंतर स्वत:ला सांभाळताना ते पुढे म्हणाले, साहेबांनी कुटुंबाच्या आत विभाजन केले. लोकसभेच्या वेळेस मतदार भावूक झाले होते. यावेळेस भावूक होऊ नका. कारण भावूक होण्याने समस्या सुटत नाहीत. विकासाने समस्या सुटतात. बारामतीच्या जनतेते ताईंना लोकसभेत निवडले आता दादांना आमदार म्हणून निवडले पाहिजे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बारामती येथून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,