मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election 2024) उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू आहेत. त्यातच बारामती मतदारसंघातून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीला त्यांनी संबोधित केले. या दरम्यान अजित पवार भावूक झाले. सोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोपही केला.
कार्यकर्त्यांशी बातचीत करताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संगातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा यांना उतरवून खूप चूक केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचे आहे की राजकारणाला इतक्या खालच्या पातळीवर नाही आणले पाहिजे, कारण पीढी एक होण्यास वेळ लागतो आणि कुटुंब तोडण्यास एक क्षणही पुरेसा असतो.
अजित पवार यावेळी बोलताना अतिशय भावूक झाले. त्यानंतर स्वत:ला सांभाळताना ते पुढे म्हणाले, साहेबांनी कुटुंबाच्या आत विभाजन केले. लोकसभेच्या वेळेस मतदार भावूक झाले होते. यावेळेस भावूक होऊ नका. कारण भावूक होण्याने समस्या सुटत नाहीत. विकासाने समस्या सुटतात. बारामतीच्या जनतेते ताईंना लोकसभेत निवडले आता दादांना आमदार म्हणून निवडले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बारामती येथून अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…