Radhakrishna Vikhepatil : इतके दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे!

  81

राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर आक्रमक पवित्रा


संगमनेर : संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे महायुतीची (Mahayuti) सभा झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री व महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी आक्रमक होऊन चांगलाच हल्लाबोल केला आहे.


'संगमनेर तालुक्यात आम्हाला येऊ देणार नाही, संगमनेर तालुका काय तुमच्या बापाचा आहे का? इतक्या दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटला होता आता गाठ आमच्याशी आहे', अशी आक्रमक पवित्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा केला आहे.



संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू


पुढे बोलताना ते म्हणाले की या संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू आहे त्या दहशतीचे झाकण आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य जनतेचा रोष तुमच्यावर आहे. यावेळी नक्कीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होणार. त्याचबरोबर तुम्ही महिलांना पुढे करून आंदोलन करत आहे, हे तुम्हाला शोभतं का? आमच्या राहता तालुक्यामध्ये येऊन सुसंस्कृतपणा दाखवायचा आणि लोकशाही आहे असं म्हणायचं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या संगमनेर मध्ये जाळतात.


आमच्याकडे लोकशाही आणि तुमच्याकडे लोकशाही नाही का गाड्या जाळनाऱ्याना आम्ही सोडणार नाही. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्वरित जाहीर निषेध केला. परंतु राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी वृत्ती येथील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे आम्ही आता याला घाबरणार नाही, यावेळी संगमनेर ची जनता परिवर्तन करून दाखवणारच असेही विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या