Radhakrishna Vikhepatil : इतके दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे!

  104

राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर आक्रमक पवित्रा


संगमनेर : संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे महायुतीची (Mahayuti) सभा झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री व महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी आक्रमक होऊन चांगलाच हल्लाबोल केला आहे.


'संगमनेर तालुक्यात आम्हाला येऊ देणार नाही, संगमनेर तालुका काय तुमच्या बापाचा आहे का? इतक्या दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटला होता आता गाठ आमच्याशी आहे', अशी आक्रमक पवित्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा केला आहे.



संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू


पुढे बोलताना ते म्हणाले की या संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू आहे त्या दहशतीचे झाकण आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य जनतेचा रोष तुमच्यावर आहे. यावेळी नक्कीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होणार. त्याचबरोबर तुम्ही महिलांना पुढे करून आंदोलन करत आहे, हे तुम्हाला शोभतं का? आमच्या राहता तालुक्यामध्ये येऊन सुसंस्कृतपणा दाखवायचा आणि लोकशाही आहे असं म्हणायचं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या संगमनेर मध्ये जाळतात.


आमच्याकडे लोकशाही आणि तुमच्याकडे लोकशाही नाही का गाड्या जाळनाऱ्याना आम्ही सोडणार नाही. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्वरित जाहीर निषेध केला. परंतु राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी वृत्ती येथील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे आम्ही आता याला घाबरणार नाही, यावेळी संगमनेर ची जनता परिवर्तन करून दाखवणारच असेही विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार

'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर

रक्षाबंधनच्या लॉन्ग विकेंडने एसटीला कमावून दिले १३७ कोटींचे विक्रमी उत्पन्न

मुंबई: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाने