Radhakrishna Vikhepatil : इतके दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटलात, आता गाठ आमच्याशी आहे!

राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर आक्रमक पवित्रा


संगमनेर : संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे महायुतीची (Mahayuti) सभा झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकमंत्री व महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी आक्रमक होऊन चांगलाच हल्लाबोल केला आहे.


'संगमनेर तालुक्यात आम्हाला येऊ देणार नाही, संगमनेर तालुका काय तुमच्या बापाचा आहे का? इतक्या दिवस तुम्ही सामान्य माणसाला खेटला होता आता गाठ आमच्याशी आहे', अशी आक्रमक पवित्रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा केला आहे.



संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू


पुढे बोलताना ते म्हणाले की या संगमनेर तालुक्यात दहशतीचे राजकारण चालू आहे त्या दहशतीचे झाकण आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य जनतेचा रोष तुमच्यावर आहे. यावेळी नक्कीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होणार. त्याचबरोबर तुम्ही महिलांना पुढे करून आंदोलन करत आहे, हे तुम्हाला शोभतं का? आमच्या राहता तालुक्यामध्ये येऊन सुसंस्कृतपणा दाखवायचा आणि लोकशाही आहे असं म्हणायचं मग आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या संगमनेर मध्ये जाळतात.


आमच्याकडे लोकशाही आणि तुमच्याकडे लोकशाही नाही का गाड्या जाळनाऱ्याना आम्ही सोडणार नाही. वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्वरित जाहीर निषेध केला. परंतु राजकारण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशी वृत्ती येथील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे आम्ही आता याला घाबरणार नाही, यावेळी संगमनेर ची जनता परिवर्तन करून दाखवणारच असेही विखे पाटील म्हणाले.

Comments
Add Comment

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया

Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस