Mohammed Shami : महम्मद शामीने मागितली बीसीसीआयची माफी!

शमीचे भारतीय संघांत पुनरागमन लांबणीवर


नवी दिल्ली : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात मोहम्मद शमीला निवडण्यात आलेले नाही. त्यानंतर आता शमीने एक पोस्ट शेअर करत बीसीसीआयची माफी मागितली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात २२ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.


ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठीही महत्त्वाची आहे. मात्र, या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संघात संधी मिळालेली नाही. यामागील कारण म्हणजे त्याची तंदुरुस्ती आहे. शमी गेल्या एक वर्षापासून पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. मात्र, त्याला पुरेशी तंदुरुस्ती राखण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवडण्यात आलेलं नाही. त्याच्याआधी या दौऱ्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांना संघात संधी देण्यात आली आहे.


दरम्यान, यानंतर आता शमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयचीही माफी मागितली आहे. शमीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो जिममध्ये ट्रेनिंग करत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की 'दिवसेंदिवस गोलंदाजी करण्यासाठी लागणारी तंदुरुस्ती मिळण्यासाठी मेहनत घेत आहे.' 'सामना खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज होण्याच्या हेतूने मेहनत करत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागतो, पण मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज होईल. सर्वांना खूप प्रेम.' अनफिट मोहम्मद शामी. आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; शमी भारताकडून अखेरचा नोव्हेंबर २०२३ मध्ये वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर टाचेच्या दुखापतीमुळे तो मैदानातून बाहेर होता. अखेर यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला टाचेजवळ शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. यातून तो सावरत असतानच त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले.



काही दिवसात रणजी ट्रॉफीसाठी खेळणार


भारतीय संघाला अपेक्षा आहे की शमी लवकरच पूर्ण तंदुरुस्त होऊन पुनरागमन करेल. सध्या अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की शमी येत्या काही दिवसात रणजी ट्रॉफीमधील सामने खेळेले. यातून जर त्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली, तर तो भारतीय संघातही पुनरागमन करेल. शमीने त्याच्या कारकिर्दीत ६४ कसोटी सामने खेळले असून २२९ विकेट्स घेतल्या आहेत, तर १०१ वनडे सामन्यांत १९५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक