वांद्रे चेंगराचेंगरी प्रकरणानंतर मध्य रेल्वेने घेतला हा मोठा निर्णय

  170

मुंबई: मुंबईच्या वांद्रे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने हा निर्णय तात्काळ लागू केला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


दिवाळी तसेच छट पुजेदरम्यान मूव्हमेंट सुरळीतपणे व्हावी यासाठी मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.


 


दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले हे निर्बंध तात्काळ लागू केले जातील. तसेच हे निर्बंध ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू असतील. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय दृष्ट्‍या आजारी प्रवाशांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.


वांद्रे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात ९ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली