मुंबई: मुंबईच्या वांद्रे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने हा निर्णय तात्काळ लागू केला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळी तसेच छट पुजेदरम्यान मूव्हमेंट सुरळीतपणे व्हावी यासाठी मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले हे निर्बंध तात्काळ लागू केले जातील. तसेच हे निर्बंध ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू असतील. ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या आजारी प्रवाशांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात ९ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…