भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार, रहा सावध

  102

मुंबई: दिवाळीत नकली मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे सणांच्या दिवसांत मिठाईला खूप मागणी असते. खवा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते.खव्यामध्ये तर धोकादायक केमिकल मिसळले जातात. जसे कागद, रिफाईंड तेल, स्किम्ड मिल्क पावडर, युरिया, स्टार्च, माल्टोडेक्सट्रिन, सोडियम क्लोराईल, डिटर्जंट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मलडिहाईड,हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. इतकंच नव्हे तर यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.



खराब खव्याचा केला जातो वापर


मिठाईबद्दल बोलायचे झाल्यास यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याचा वापर केला जातो. अनेक दिवसांपासून ठेवलेला खवा गरम करून त्याला ताजे करून विकला जातो. दरम्यान, मिठाई असो वा खवा खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी जरूर घेतली पाहिजे. पदार्थ चांगले दिसण्यासाठी तसेच सुंगंधित बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र ही केमिकल्स शरीरासाठी हानिकारक आहेत.



चांदीचा वर्ख पाहून खरेदी करा मिठाई


सणासुदीच्या काळात दुकानांवर चांदीचा वर्ख लावून मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. हा चांदीचा वर्ख आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, वर्ख चांगला आहे की नाही याची खातरजमा करून मगच खवा खरेदी करा. तसेच रंगीबेरंगी मिठाई खरेदी करू नका. कारण रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



कॅन्सर होण्याचा धोका


मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. खाण्याच्या रंगाचा वापरही शरीरासाठी तितका चांगला नाही. दरम्यान, इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी रंगांमध्ये कार्बन तसेच मेटलही असतात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. अॅलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत अशी मिठाई खाल्ल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी