भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार, रहा सावध

मुंबई: दिवाळीत नकली मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे सणांच्या दिवसांत मिठाईला खूप मागणी असते. खवा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते.खव्यामध्ये तर धोकादायक केमिकल मिसळले जातात. जसे कागद, रिफाईंड तेल, स्किम्ड मिल्क पावडर, युरिया, स्टार्च, माल्टोडेक्सट्रिन, सोडियम क्लोराईल, डिटर्जंट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मलडिहाईड,हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. इतकंच नव्हे तर यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.



खराब खव्याचा केला जातो वापर


मिठाईबद्दल बोलायचे झाल्यास यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याचा वापर केला जातो. अनेक दिवसांपासून ठेवलेला खवा गरम करून त्याला ताजे करून विकला जातो. दरम्यान, मिठाई असो वा खवा खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी जरूर घेतली पाहिजे. पदार्थ चांगले दिसण्यासाठी तसेच सुंगंधित बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र ही केमिकल्स शरीरासाठी हानिकारक आहेत.



चांदीचा वर्ख पाहून खरेदी करा मिठाई


सणासुदीच्या काळात दुकानांवर चांदीचा वर्ख लावून मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. हा चांदीचा वर्ख आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, वर्ख चांगला आहे की नाही याची खातरजमा करून मगच खवा खरेदी करा. तसेच रंगीबेरंगी मिठाई खरेदी करू नका. कारण रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



कॅन्सर होण्याचा धोका


मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. खाण्याच्या रंगाचा वापरही शरीरासाठी तितका चांगला नाही. दरम्यान, इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी रंगांमध्ये कार्बन तसेच मेटलही असतात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. अॅलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत अशी मिठाई खाल्ल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले