भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार, रहा सावध

मुंबई: दिवाळीत नकली मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे सणांच्या दिवसांत मिठाईला खूप मागणी असते. खवा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते.खव्यामध्ये तर धोकादायक केमिकल मिसळले जातात. जसे कागद, रिफाईंड तेल, स्किम्ड मिल्क पावडर, युरिया, स्टार्च, माल्टोडेक्सट्रिन, सोडियम क्लोराईल, डिटर्जंट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मलडिहाईड,हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. इतकंच नव्हे तर यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.



खराब खव्याचा केला जातो वापर


मिठाईबद्दल बोलायचे झाल्यास यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याचा वापर केला जातो. अनेक दिवसांपासून ठेवलेला खवा गरम करून त्याला ताजे करून विकला जातो. दरम्यान, मिठाई असो वा खवा खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी जरूर घेतली पाहिजे. पदार्थ चांगले दिसण्यासाठी तसेच सुंगंधित बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र ही केमिकल्स शरीरासाठी हानिकारक आहेत.



चांदीचा वर्ख पाहून खरेदी करा मिठाई


सणासुदीच्या काळात दुकानांवर चांदीचा वर्ख लावून मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. हा चांदीचा वर्ख आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, वर्ख चांगला आहे की नाही याची खातरजमा करून मगच खवा खरेदी करा. तसेच रंगीबेरंगी मिठाई खरेदी करू नका. कारण रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



कॅन्सर होण्याचा धोका


मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. खाण्याच्या रंगाचा वापरही शरीरासाठी तितका चांगला नाही. दरम्यान, इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी रंगांमध्ये कार्बन तसेच मेटलही असतात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. अॅलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत अशी मिठाई खाल्ल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली