भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने होऊ शकतात हे आजार, रहा सावध

मुंबई: दिवाळीत नकली मिठाई बाजारात मोठ्या प्रमाणावर आढळते. यामागचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे सणांच्या दिवसांत मिठाईला खूप मागणी असते. खवा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असते.खव्यामध्ये तर धोकादायक केमिकल मिसळले जातात. जसे कागद, रिफाईंड तेल, स्किम्ड मिल्क पावडर, युरिया, स्टार्च, माल्टोडेक्सट्रिन, सोडियम क्लोराईल, डिटर्जंट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि फॉर्मलडिहाईड,हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतात. इतकंच नव्हे तर यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.



खराब खव्याचा केला जातो वापर


मिठाईबद्दल बोलायचे झाल्यास यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याचा वापर केला जातो. अनेक दिवसांपासून ठेवलेला खवा गरम करून त्याला ताजे करून विकला जातो. दरम्यान, मिठाई असो वा खवा खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी जरूर घेतली पाहिजे. पदार्थ चांगले दिसण्यासाठी तसेच सुंगंधित बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र ही केमिकल्स शरीरासाठी हानिकारक आहेत.



चांदीचा वर्ख पाहून खरेदी करा मिठाई


सणासुदीच्या काळात दुकानांवर चांदीचा वर्ख लावून मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. हा चांदीचा वर्ख आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. दरम्यान, वर्ख चांगला आहे की नाही याची खातरजमा करून मगच खवा खरेदी करा. तसेच रंगीबेरंगी मिठाई खरेदी करू नका. कारण रंगांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.



कॅन्सर होण्याचा धोका


मिठाईंमध्ये मोठ्या प्रमाणात रंगाचा वापर केला जातो. खाण्याच्या रंगाचा वापरही शरीरासाठी तितका चांगला नाही. दरम्यान, इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी रंगांमध्ये कार्बन तसेच मेटलही असतात. यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचू शकते. अॅलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत अशी मिठाई खाल्ल्याने कॅन्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा