ST Bus : दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा!

पुण्यासाठी ३०, छत्रपती संभाजीनगरसाठी १०, धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या


नाशिक : दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होणार असून या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक राज्य परिवहन विभागाच्या (State Transport Department) वतीने पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, बोरिवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


पुण्यासाठी ३० हून अधिक, छत्रपती संभाजीनगरसाठी १० आणि धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या होणार आहेत.. विभागातंर्गत असलेल्या मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगाव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, पिंपळगाव या आगारांमार्फतही विविध मार्गावर अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.


मालेगाव, सटाणा, येवलासाठी जादा बससेवेचे नियोजन आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलत दिली जात आहे. तसेच नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. प्रवाशांनी या अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने साधी बस तसेच वातानुकूलित बससेवेत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात