काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील नाशिकमध्ये अपक्ष लढणार

नाशिक : नाशिक मध्य मतदार संघात शिवसेना उबाठा सेनेला जागा सोडल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार व्यक्त करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.


गेल्या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यावरही तब्बल ४० हजारपेक्षा जास्त मते प्राप्त केली होती. त्यामुळे या निवडणुकीत लढण्याचा अधिकार आपलाच असल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र सदर जागा सोडून वसंत गीते यांना येथे उमेदवारी देण्यात आली आहे.


नाशिक शहरात काँग्रेसला चारपैकी एकही जागा न सोडल्याने संतप्त झालेल्या काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी काँग्रेस भवनला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर शुक्रवारी डॉ. पाटील यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत आपण निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर करत असल्याचे जाहीर केले.


या पोस्टमध्ये डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, गेली ३० वर्षे पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे. गेल्या निवडणुकीत माझी कोणतीही तयारी नसताना ऐनवेळी पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल ४६३०० मते मिळवली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसने मला आश्वासन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उबाठा गटाला सोडली. पक्षाला संपूर्ण नाशिक शहरामध्ये चारपैकी एकही जागा वाट्याला आलेली नाही, हे दुर्दैव. म्हणूनच मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निश्चय केला आहे. मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत डोळ्यांसमोर पहाताना वेदना होत आहेत.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच