कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत. ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठाच्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत. ते काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणामधून तर उबाठाने काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटत आहेत. त्यातल्या किती जागा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे जाहीर करावे. आज काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भुईसपाट केले आहे, संपवून टाकले आहे. याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही, असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…