कोकणात एकही जागा न देता उबाठाने काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली!

कणकवली : काँग्रेस पक्षाच्या यादीत असलेल्या जागांवर उद्धव ठाकरे आपले एबी फॉर्म देऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी देत आहेत. राज्यात अशा दहा जागा आहेत. ज्या वर दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी समोर चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीची पिपाणी वाजवायची आणि दुसरीकडे स्वतःच्या मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला भीक न घालता आपल्या पक्षाची उमेदवारी वाटण्याचे काम उबाठाच्या माध्यमातून सुरू आहे. यातूनच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आयुष्यात कोणाचेच होऊ शकले नाहीत. ते काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ही होऊ शकत नाहीत हे दिसून आले आहे. कोकणामधून तर उबाठाने काँग्रेसला एकही जागा न देता भावपूर्ण श्रद्धांजलीच वाहिली आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.


आमदार नितेश राणे पत्रकार परिषद कणकवली येथे बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटत आहेत. त्यातल्या किती जागा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या हे काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणे जाहीर करावे. आज काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरे यांनी भुईसपाट केले आहे, संपवून टाकले आहे. याचा काँग्रेसने विचार केला पाहिजे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही, असा सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.

Comments
Add Comment

धक्कादायक! सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

- सहा सावकारांची संपत्ती गोठवणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश मुंबई : खासगी सावकारांकडून घेतलेल्या

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा

BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०,९५२ कोटी रुपयांचा

करमणूक शुल्क, फेरीवाल्यांना क्यूआर प्रमाणपत्र आणि निधीसाठी महापालिका बाँड्स काढणार महापालिका आयुक्त डॉ भूषण

मुलांचे 'डिजिटल व्यसन' सुटणार! राज्य सरकारकडून तज्ज्ञांची 'टास्क फोर्स' नियुक्त; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई : मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास