दुखापत झाली, रक्त वाहत होते तरीही या खेळाडूने सोडले नाही मैदान

मुंबई: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ३४४ धावा केल्या. या दरम्यान साजिद खानने ४८ धावांची खेळी केली. साजिद खेळताना खूप दुखापतग्रस्त झाला. मात्र तरीही त्याने मैदान सोडले नाही. साजिदला जखम झाली होती. त्यामुळे रक्तही येऊ लागले होते.


साजिद पाकिस्तानसाठी १०व्या स्थानावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. या दरम्यान ९२व्या षटकातील चौथ्या बॉलवर तो दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडकडून रेहान अहमद ओव्हर करत होता. त्याचा बॉल साजिदच्या हेल्मेटमधून आत जात हाडांवर लागला. यामुळे रक्त वाहत होते. दरम्यान ते मैदान सोडून आले नाही. साजिदची ही स्थिती पाहून फिजिओ मैदानावर आले. त्यांना प्राथमिक उपचार दिले. साजिदने जर्सी बदलली आणि पुन्हा खेळायला लागला.



पाकिस्तानसाठी साजिदची दमदार कामगिरी


साजिदने पाकिस्तानसाठी रावळपिंडी कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ विकेट मिळवल्या. साजिदने २९.२ षटकांत १२८ धावा केल्या. साजिदने यानंतर बॅटिंगमध्येही कमाल केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ४८ धावा केल्या. सजितने २ चौकार आणि ४ षटकार लगावले. पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावत २४ धावा केल्या. या दरम्यान साजिदने १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स