दुखापत झाली, रक्त वाहत होते तरीही या खेळाडूने सोडले नाही मैदान

मुंबई: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ३४४ धावा केल्या. या दरम्यान साजिद खानने ४८ धावांची खेळी केली. साजिद खेळताना खूप दुखापतग्रस्त झाला. मात्र तरीही त्याने मैदान सोडले नाही. साजिदला जखम झाली होती. त्यामुळे रक्तही येऊ लागले होते.


साजिद पाकिस्तानसाठी १०व्या स्थानावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. या दरम्यान ९२व्या षटकातील चौथ्या बॉलवर तो दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडकडून रेहान अहमद ओव्हर करत होता. त्याचा बॉल साजिदच्या हेल्मेटमधून आत जात हाडांवर लागला. यामुळे रक्त वाहत होते. दरम्यान ते मैदान सोडून आले नाही. साजिदची ही स्थिती पाहून फिजिओ मैदानावर आले. त्यांना प्राथमिक उपचार दिले. साजिदने जर्सी बदलली आणि पुन्हा खेळायला लागला.



पाकिस्तानसाठी साजिदची दमदार कामगिरी


साजिदने पाकिस्तानसाठी रावळपिंडी कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ विकेट मिळवल्या. साजिदने २९.२ षटकांत १२८ धावा केल्या. साजिदने यानंतर बॅटिंगमध्येही कमाल केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ४८ धावा केल्या. सजितने २ चौकार आणि ४ षटकार लगावले. पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावत २४ धावा केल्या. या दरम्यान साजिदने १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य