दुखापत झाली, रक्त वाहत होते तरीही या खेळाडूने सोडले नाही मैदान

  46

मुंबई: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ३४४ धावा केल्या. या दरम्यान साजिद खानने ४८ धावांची खेळी केली. साजिद खेळताना खूप दुखापतग्रस्त झाला. मात्र तरीही त्याने मैदान सोडले नाही. साजिदला जखम झाली होती. त्यामुळे रक्तही येऊ लागले होते.


साजिद पाकिस्तानसाठी १०व्या स्थानावर बॅटिंग करण्यासाठी आला होता. या दरम्यान ९२व्या षटकातील चौथ्या बॉलवर तो दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडकडून रेहान अहमद ओव्हर करत होता. त्याचा बॉल साजिदच्या हेल्मेटमधून आत जात हाडांवर लागला. यामुळे रक्त वाहत होते. दरम्यान ते मैदान सोडून आले नाही. साजिदची ही स्थिती पाहून फिजिओ मैदानावर आले. त्यांना प्राथमिक उपचार दिले. साजिदने जर्सी बदलली आणि पुन्हा खेळायला लागला.



पाकिस्तानसाठी साजिदची दमदार कामगिरी


साजिदने पाकिस्तानसाठी रावळपिंडी कसोटीत शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ६ विकेट मिळवल्या. साजिदने २९.२ षटकांत १२८ धावा केल्या. साजिदने यानंतर बॅटिंगमध्येही कमाल केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ४८ धावा केल्या. सजितने २ चौकार आणि ४ षटकार लगावले. पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ विकेट गमावत २४ धावा केल्या. या दरम्यान साजिदने १ विकेट घेतली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार