IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केला संघ, केएल राहुलला संधी

मुंबई: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आङे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये केएल राहुललाही संधी मिळाली आहे. राहुल नुकताच खराब कामगिरीमुळे चर्चेत होता. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उप कर्णधार असणार आहे.


अभिमन्यू-ईश्वरन आणि प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. नीतीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १५ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे .यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यावरही विश्वास ठेवला आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून संघाचा भाग बनले आहेत. सर्फराज खानलाही टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे.



टीम इंडियाची घातक गोलंदाजी


बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि आकाशदीप ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाचा भाग असणार आहे. प्रसिद्ध कृष्णा दीर्घकाळानंततर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे.



बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.