IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केला संघ, केएल राहुलला संधी

  91

मुंबई: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आङे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये केएल राहुललाही संधी मिळाली आहे. राहुल नुकताच खराब कामगिरीमुळे चर्चेत होता. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उप कर्णधार असणार आहे.


अभिमन्यू-ईश्वरन आणि प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. नीतीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १५ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे .यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यावरही विश्वास ठेवला आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून संघाचा भाग बनले आहेत. सर्फराज खानलाही टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे.



टीम इंडियाची घातक गोलंदाजी


बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि आकाशदीप ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाचा भाग असणार आहे. प्रसिद्ध कृष्णा दीर्घकाळानंततर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे.



बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन