Atul Mhatre : अतुल म्हात्रेंना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी महाराजांसमोर घेतली शपथ!

रायगड किल्ल्यावर जाऊन केला प्रचाराचा शुभारंभ


पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघातून शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. आज रायगड किल्ल्यावरून अतुल म्हात्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.


"छत्रपती शिवाजी महाराज की जय", "जय भवानी, जय शिवाजी" अशा घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमला होता. पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शेकाप व आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.


यावेळी रायगडावर जि.प.सदस्य सुरेश खैरे, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, रोशन पाटील, प्रल्हाद पाटील, निलेश म्हात्रे, दिपक पाटील, एन.जी.ठाकूर, राजन झेमसे, नरेंद्र पाटील, नमिता म्हात्रे, महाबळे, राजेश पाटील, सुनील वाघमारे, मंगेश पाटील, वैभव पाटील, विकी पाटील, तेजस पाटील, खाडेकर गुरुजी, नासीर भाई आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये