पंख छाटण्याचा प्रश्नच नाही; तुम्हाला आग लावण्याशिवाय दुसरं कामच नाही- नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना फटकारले


मुंबई :पंख छाटण्याचा प्रश्नच नाही,मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवले,असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत नाना पटोले आणि उबाठा सेनेत खडाजंगी सुरु असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे जागावाटपावर चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मीच पाठवले असल्याचे स्पष्ट केले.


यावर बोलताना नाना पटोले म्हणाले,महाविकास आघाडीचा जागावाटपावर तोडगा आजच निघायला हवा,अशीच आमचीही इच्छा आहे. जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मीच बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठवले होते. जागांबाबत अदलाबदल होऊ शकतो, असा संदेश थोरात यांनी आणला आहे. त्यानंतर आता जागावाटपावर बैठक होणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.


माझे पंख छाटल्याचा प्रश्नच येत नाही. माझे पंख छाटलेले नाहीत, आमच्यापेक्षा तुम्ही महायुतीचा सागर बंगल्यावर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर काय चाललंय, कसे कपडे फाडले जात आहेत, ते दाखवा. तुम्हाला आग लावण्याशिवाय दुसरं कामच नाही, या शब्दांत पटोले यांनी माध्यमांना फटकारले.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस