Weather Update : परतीच्या पावसाचा जोर ओसरला! 'या' तारखेपासून लागणार गुलाबी थंडीची चाहूल

मुंबई : काही दिवसांपासून राज्यभरात धूमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर ओसरत चालला असल्याचे दिसून येत आहे. तर अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांत परतीचा पाऊस गायब होणार असून नागरिकांना गुलाबी थंडीची (Cold weather) चाहूल लागणार आहे.


येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असून त्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.



कधीपासून पसरणार थंडीची चादर?


१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला या भागात थंडीला सुरुवात होईल.



या कालावधीत असणार पावसाची उघडीप


उद्यापासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते. २६ ते २९ दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार दिवसात दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली