SBIची ४४४ दिवसांची शानदार स्कीम...जबरदस्त व्याज आणि बरंच काही...

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआय अनेक गुंतवणूकदारांसाठी चांगला सेव्हिंग प्लान आहे. यात मिळणारे जोरदार रिटर्न्स यांना खास बनवत आहे. वरिष्ठ नागरिकांनाही अधिक फायदा मिळतो.


अशीच एक खास स्कीम एसबीआयने आणली आहे. ही आहे अमृतवृष्टी. ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. यात गुंवतणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ४४४ दिवसांसाठी पैसै जमा करावे लागतील आणि यावर बँकेकडून ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाईल.


एसबीआयच्या वेबसाईटनुार या स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज दर ऑफर केले जात आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी या स्कीममध्ये ४४४ दिवसांसाठी वर्षाला ७.७५ टक्के व्याजदर मिळत आहे.


बँकेकडून या स्पेशल स्कीमची सुरूवात १५ जुलैला करण्यात आली होती. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या एसबीआयच्या स्कीममध्ये गुंतवणूकदार केवळ १०० रूपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीसह अकाऊंट सुरू करून गुंतवणूक सुरू करू शकतात. तर अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.


अमृतवृष्टी योजनेमध्ये कालावधीच्या आधी पैसे काढण्याची सुविधा आहे. यासोबतच ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर लोनही मिळते. ग्राहक एसबीआय ब्राँचसह योनो एसबीआय आणि योना लाईट अॅप्स अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊनही अकाऊंट सुरू करू शकतात.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या