मुंबई: काळा टिक्का लावल्याने आपले वाईट नजरेपासून संरक्षण होते. मात्र अनेकांना हा काळाच रंग आवडत नाही. याचमुळे सावळ्या रंगाच्या लोकांना अनेकदा आपल्या जीवनात त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका नवविवाहितेने आत्महत्या केली. यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न एका सावळ्या मुलाशी झाले होते.
सावळ्या रंगाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे ही नवविवाहित तरूणी खुश नव्हती. अशातच लग्नाच्या चार महिन्यांनी तिने फाशी लावून घेत आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलिसांच्या नंतर माहेरचे लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासानंतर नवविवाहितेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
ही घटना हाथरस शहरातील कोतवाली क्षेत्राच्या मोहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. येथील तौफीक नावाच्या तरूणीचे ४ महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबाद येथे राहणाऱ्या सिमरनसोबत लग्न झाले होते. सिमर आपल्या पतीच्या सावळ्या रंगामुळे नाखुश होती. तिला आपल्या पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली.
सिमरनच्या कुटुंबियांनी सांगितले की ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती सावळा होता. अशातच तिचे पतीशी भांडण होत असे. त्यातच तिने मंगळवारी फाशी लावून घेत आत्महत्या केली.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…