पतीच्या सावळ्या रंगामुळे दुखी: होती पत्नी, लग्नाच्या ४ महिन्यांतच केली आत्महत्या

मुंबई: काळा टिक्का लावल्याने आपले वाईट नजरेपासून संरक्षण होते. मात्र अनेकांना हा काळाच रंग आवडत नाही. याचमुळे सावळ्या रंगाच्या लोकांना अनेकदा आपल्या जीवनात त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका नवविवाहितेने आत्महत्या केली. यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न एका सावळ्या मुलाशी झाले होते.


सावळ्या रंगाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे ही नवविवाहित तरूणी खुश नव्हती. अशातच लग्नाच्या चार महिन्यांनी तिने फाशी लावून घेत आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलिसांच्या नंतर माहेरचे लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासानंतर नवविवाहितेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.


ही घटना हाथरस शहरातील कोतवाली क्षेत्राच्या मोहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. येथील तौफीक नावाच्या तरूणीचे ४ महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबाद येथे राहणाऱ्या सिमरनसोबत लग्न झाले होते. सिमर आपल्या पतीच्या सावळ्या रंगामुळे नाखुश होती. तिला आपल्या पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली.


सिमरनच्या कुटुंबियांनी सांगितले की ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती सावळा होता. अशातच तिचे पतीशी भांडण होत असे. त्यातच तिने मंगळवारी फाशी लावून घेत आत्महत्या केली.

Comments
Add Comment

Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरु उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे