ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाड बनला कर्णधार

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(australia tour) जाणाऱ्या इंडिया एच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात दोन फर्स्ट क्लास सामने खेळवले जातील. फर्स्ट क्लास सामन्यांच्या या मालिकेसाठी इंडिया एच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.


इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन फर्स्ट क्लास सामन्यांची सुरूवात ३१ ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिला सामना ३ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. याशिवाय मालिकेतील दुसरा सामना ७ पासून १० नोव्हेंबर यांच्यात रंगेल. पहिला सामना मकाय आणि दुसरा मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर इंडिया एचा संघ भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध १५ नोव्हेंबरपासून तीन दिवसांची इंट्रा स्क्वॉड सामना पर्थमध्ये खेळणार आहे.


इंडिया ए दौऱ्यासाठी गेल्या काही काळापासून टीम इंडियामधून बाहेर असलेला विकेटकीपर फलंदाज इशान किशनलाही समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अभिमन्यू ईश्वरनला गायकवाडचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय संघात अनेक स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.



ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंडिया ए टीम


ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियान.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत