ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ऋतुराज गायकवाड बनला कर्णधार

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(australia tour) जाणाऱ्या इंडिया एच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात दोन फर्स्ट क्लास सामने खेळवले जातील. फर्स्ट क्लास सामन्यांच्या या मालिकेसाठी इंडिया एच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.


इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन फर्स्ट क्लास सामन्यांची सुरूवात ३१ ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिला सामना ३ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. याशिवाय मालिकेतील दुसरा सामना ७ पासून १० नोव्हेंबर यांच्यात रंगेल. पहिला सामना मकाय आणि दुसरा मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर इंडिया एचा संघ भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध १५ नोव्हेंबरपासून तीन दिवसांची इंट्रा स्क्वॉड सामना पर्थमध्ये खेळणार आहे.


इंडिया ए दौऱ्यासाठी गेल्या काही काळापासून टीम इंडियामधून बाहेर असलेला विकेटकीपर फलंदाज इशान किशनलाही समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अभिमन्यू ईश्वरनला गायकवाडचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय संघात अनेक स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.



ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंडिया ए टीम


ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियान.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात