तुम्हीही फोनवर कव्हर लावता का? जाणून घ्या नुकसान

मुंबई: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण फोनच्या कव्हरचा वापर करतात. यामुळे फोन पडण्यापासून बचाव होतो. मात्र कव्हर लावण्याचे अनेक नुकसानही आहेत.


मागील कव्हरमुळे फोनची उष्णता योग्य पद्धतीने पास होत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. फोन गरम होणे त्यातील अनेक पार्टसाठी चांगले नसते. तुमच्या स्मार्टफोनचे अनेक सेन्सॉर असतात जे अधिक उष्ण झाल्याने खराब होऊ शकतात.


अनेकदा हेही पाहायला मिळाले आहे की मागील कव्हरमुळे फोनला सिग्नल कमी मिळतो. यामुळे कॉल क्वालिटी आणि इंटरनेट स्पीडवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर फोनच्या कव्हरमुळे फोन अधिक गरम होतो. तसेच चार्जिंग स्पीडही स्लो होतो. याचा परिणाम आपल्या बॅटरीवरही पडू शकतो.


स्मार्टफोन गरम झाल्याने त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. फोन अधिक उष्ण झाल्याने अनेक फीचर्स काम करणे बंद होतात आणि अनेकदा तर फोन ऑफही होतो.



नेहमी योग्य कव्हर खरेदी करा


स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बॅक कव्हर निवडले पाहिजे. ब्राँडेड फोन्ससाठी स्पेशल कव्हर बनवलेले असतात जे थोडे महागडे असतात. तुम्ही त्यातील निवडू शकता.



विना कव्हरचा वापर


जर तुमच्या हातातून फोन पडत नसेल आणि तुम्ही डिव्हाईसचे नीट लक्ष देत असाल तर तुम्ही स्मार्टफोन विना कव्हर वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल. दीर्घकाळ फोनला जर कव्हर लावून ठेवले तर फोनवर निशाण पडतात. याशिवाय अनेक पार्ट्समध्ये घाणही जमा होते. यामुळे तो वेळच्या वेळी साफ केला पाहिजे.

Comments
Add Comment

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास

रस्त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक उपक्रम महापालिका राबवणार, कनिष्ठ पर्यवेक्षकांवर दोन ते तीन रस्त्यांची जबाबदारी सोपवणार

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते

मुंबईत जमिनीखाली १८ मीटर खोलवर भुयारी मेट्रोला मिळणार बीएसएनएलचे नेटवर्क ?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही दिवसांपूर्वी जेव्हीआरएल-बीकेसी-कफ परेड या भुयारी मेट्रो